पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर
पालघर जिल्यातील अतिदुर्गम म्हणून ओळखले जाणारे तालुके जव्हार,मोखाडा या तालुक्यांमध्ये आज भारताला स्वातंत्र्य होवून ७५ वर्ष पूर्ण झाले असून येथील नागरिकांना अजून पर्यंत मूलभूत गरजा सुद्धा उपलब्ध झालेल्या नसून यासाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष ( मार्क्सवादी )तिच्या संघटना किसानसभा (DYFI) व जनवादी महिला संघटना जव्हार मोखाडा तालुका यांनी आज दिनांक २५ नोव्हेंबर रोजी जव्हार प्रांत कार्यालयावर विविध मागण्यासाठी रॅली काढून धडक मोर्चा काढण्यात आला.
जव्हार तालुक्यातील वेगवेगळ्या गावातून शेतकरी या मोर्चा साठी त्यांच्या मागण्या घेवून हजर होते जव्हार मोखाडा तालुक्यात ओला दुष्काळ यादीत समाविष्ट करून घेणे,उतारा नावावर झाला पाहिजे,मनरेगा रोजगार मिळाला पाहिजे,सुशिक्षित बरोजगारांसाठी नोंदणी करून त्यांना बेकार भत्ता मिळाला पाहिजे,रेशनिंग कार्ड असलेल्या सर्व कुटुंबांना धान्य मिळाले पाहिजे, ड यादी मधुन बाद झालेल्या लोकांचा पुनश्च सर्वे करून पात्र करावे,नदी जोड प्रकल्प रद्द करावा,नवीन रस्ते दुरुस्त करून डांबरीकरण झाले पाहिजे ,असे खूप मागण्या घेवून येथील नागरिक हे जव्हार प्रांत कार्यालया समोर घोषणा करत आहेत .जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तो पर्यंत आम्हीच इथेच राहू असे देखील यांचे म्हणणे आहे .
या ठिकाणी सकाळी १० वाजे पासून तर आज पूर्ण दिवस नागरिक हे उन्हातान्हात या ठिकाणी बसलेले आहेत तरी सुध्दा जव्हार प्रांत कार्यालयातील कर्मचारी हे याकडे लक्ष देत नाहीत.तर हे असे वेळोवेळी मोर्चा काढून किंवा आंदोलन करून सुद्धा या कडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे तर याकडे दुर्लक्ष न करता या मागण्या आमच्या लवकर पूर्ण कराव्यात असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे .
हा मोर्चा आमदार डहाणू विधानसभा चे कॉ विनोद निकोले, कॉ किरण गहला जिल्हा सचिव ठाणे पालघर, कॉ यशवंत रतन बुधर अ.भा.की.राज्य कमिटी सदस्य , कॉ यशवंत घाटाळ सचिव जव्हार मोखाडा तसेच जिल्हा परिषद सदस्य पालघर कॉ मनीषा बुधर, प. स.सदस्य जव्हार ज्योती बुधर,जिल्हा कमिटी सदस्य कॉ रमेश बीज व वेगवेगळ्या गावातून आलेले शेतकरी बंधू आणि इतर सर्व भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी जव्हार मोखाडा तालुक्यातील पदाधिकारी व त्यांचे संघटना त्यांचे पदाधिकारी या मोर्चा साठी उपस्थित होते.