वसमत तालुक्यातील मौजे कुरुंदा परिसरातील टोकाई माता देवीच मंदिर आहे.ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते . इथे भाविक दर्शनासाठी लांबून येतात नवरात्रात नऊ दिवस या देवीची पूजा अर्चना केली जाते. सकाळी चार वाजल्यापासून ते दिवसभर दर्शनासाठी रांगच रांग लागलेली असते.सह्याद्री देवराई गड म्हणून सुद्धा ओळखले जाते . या गडावर फिल्मी दुनियेतील मराठी अभिनेता सयाजी शिंदे ह्यांनी या गडाचा नामविस्तार केला.पर्यावरण पूरक असे वातावरण या ठिकाणी निर्माण केले आहे .या ठिकाणी स्वच्छ्ता आपल्याला पहावयास मिळते. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ही पहावयास मिळतो. नऊ दिवसांचे नऊ रंग पोलिस प्रशासन बंदोबस्तात दंग
या ठिकाणी महिला होमगार्ड आपल्याला बंदोबस्तात पहावयास मिळतात.लहान मुले,महिला व पुरुष मंडळी दर्शनासाठी रांगा धरतात.या ठिकाणी भाविकांसाठी पाणी पिण्यासाठी परिसरातील श्री गणेश मिलिटरी फाउंडेशन यांच्या वतीने पाणपोई ठेवलेली आहे . प्रा.कृष्णा बागल सर नेहमी भक्तासाठी गैरसोय होऊ नये म्हणून आपल्याच मिलिटरी फाउंडेशन मधील मुल या ठिकाणी उपलब्ध करून देतात.रोज सकाळी पाच वाजता या देवीची आरती होते .दसऱ्याच्या दिवशी येते यात्रा भरते. उंच गडावर या देवीचे मंदीर आहे.मागे काही दिवसापूर्वी याच गडावर चोरी झाली होती .दानपेटी फोडून चोरट्यांनी मुदेमाल लंपास केला होता.अश्या या गडावरील देवीच दर्शन घेण्यासाठी पंच कोशितील नागरिक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येतात.
प्रतिनिधी.बालाजी पोले