आज हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब यांच्याकडे मौजे डोंगरकडा येथील सरपंच व गावकऱ्यांनी गावाजवळील नदीवर नवीन पुलाचे बांधकाम करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
दिलेल्या निवेदनात डोंगरकडा ते जवळा दरम्यान नदी असुन त्या नदीवरुन शेतातील माल वाहतुक करण्यासाठी पुल नसल्याने शेतकऱ्याचे हाल व मोठ्या प्रमाणात अर्थिक नुकसान होत आहे. व तसेच नदीच्या पलीकडच्या बाजुस ब्राम्हण,सुतार,मारवाडी,सोनार हया समाजाच्या स्मशान भुमी आहेत.तसेच पावसाळयात नदीच्या पलीकडे अंत्यविधी करण्यास फार अडचन होत आहे.
तरी मेहरबान साहेबांनी त्वरील लक्ष घालुन शेतकऱ्यासाठी व स्मशान भुमीकडे जाण्यासाठी लवकरात लवकर नदीवर पुल बांधण्याची व्यवस्था करावी.अशी विनंती डोंगरकडावासियांनी आमदार संतोष बांगर साहेब यांच्याकडे केली आहे यावेळी उपस्थितांना आमदार बांगर यांनी लवकरात लवकर सदर पुलाचे काम करण्याचे आश्वासन यावेळी दिले.