Type Here to Get Search Results !

वसमत तालुक्यातील गिरगाव व कुरुंदा परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान

वसमत तालुक्यातील गिरगाव व कुरुंदा परिसरात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान





या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे अक्षरशः उडून गेले

वाऱ्याचा वेग इतका होता की या वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला पानटपरी सुद्धा वाऱ्याच्या वेगाने पडलेली आहेत व घरावरील पत्रे वाऱ्यामध्ये उडून गेले आहेत





या वादळी वाऱ्यामुळे केळी बागायतदारांना मोठा फटका बसला असून या मध्ये केळीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे केळीची झाडे मधून मोडून पडलेली आहेत या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

वाऱ्याचा वेग अगदी सुसाट असल्यामुळे झाडाखाली बांधलेले जनावरे झाडे उपटून अंगावरती पडल्यामुळे मृत्युमुखी पडले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे





या वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून सरकारने त्वरित मदत करावी अशी गावकऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे

 91 इंडियन न्यूज नेटवर्क 
प्रतिनिधी बालाजी पोले वसमत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad