Type Here to Get Search Results !

आटपाडी | श्री सदगुरू साखर कारखाना राजेवाडीला बदनाम करण्यासाठी स्वाभिमानीची नौटंकी - राहुल बिडवे रयत क्रांती संघटना

श्री सदगुरू साखर कारखाना राजेवाडीला बदनाम करण्यासाठी स्वाभिमानीची नौटंकी - राहुल बिडवे रयत क्रांती संघटना




सदगुरू श्री श्री साखर कारखाना हा शेतकरी बांधवांना सातत्याने न्याय देताना दिसतो आहे मात्र या कारखान्याला बदनाम करण्याचे षडयंत्र सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रचले जात असून काटा मारीची नौटंकी स्वाभिमानी संघटनेने सुरू केले असल्याचे मत रयत क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राहुल बिडवे यांनी व्यक्त केले.


सध्या श्री सदगुरू साखर कारखाना राजेवाडी या कारखान्याने काटामारी केल्याचा मुद्दा उपस्थित करून स्वाभिमानी शेतकरी संघटना या कारखान्याला घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे याच विषयावर रयत क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल बिडवे यांनी पत्रकारांशी अकलूज येथे संवाद साधला


यावेळी बोलताना ते म्हणाले की स्वाभिमानी शेतकरी संघटना ही केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण विरहित असणाऱ्या साखर कारखान्याला जाणून बुजून बळीचा बकरा करताना दिसत आहे वास्तविक पाहता सदगुरू साखर कारखान्याने शेतकरी सभासद बांधवांचा विश्वास संपादन केलेला आहे. शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी या कारखान्याची आघाडीची भूमिका असते पण स्वाभिमानी शेतकरी संघटना सध्या या कारखान्यावर काटा मारी चा आरोप लावून चांगल्या चालणाऱ्या साखर कारखान्याला विनाकारण बदनाम करताना दिसत आहे.


विशेष बाब म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांचा ऊस या ठिकाणी गाळपासाठी येतो त्यांची कुठल्याही प्रकारे तक्रार आढळून येत नाही मात्र सध्या जे चालले आहे ते केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कारखान्याला बदनाम करणे आणि आपली राजकीय पोळी भाजून घेणे एवढ्याच उद्देशाने स्वाभिमानी विनाकारण यशस्वी असणाऱ्या कारखान्यावर कारखान्याला बदनाम करताना दिसत आहे.

आरोप करणाऱ्यांचे ही व्यक्ती चरित्र तपासणे गरजेचे आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले त्याचबरोबर दोन टनाने काटा मारणे हे केवळ हास्यास्पद आहे. या कारखान्याने जवळपास नऊ लाख टन ऊस गाळप केला आहे त्यातील सोलापूर जिल्ह्यातील साडेसात लाख ऊस गाळप केलेला आहे त्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न ही यामुळे निकाली निघाला आहे ही बाब सोलापूर जिल्ह्यासाठी आनंदाची आहे असे ते यावेळी बोलताना म्हणाले.यावेळी रणजित चव्हाण,गणेश जाधव,जयराज गटकर,सोमनाथ भोरे,गणेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.


काटा मारी चा विषय समोर आल्याने रयत क्रांती संघटनेच्यावतीने स्टिंग ऑपरेशन करून कारखान्याकडे गाळपासाठी जाणारा ट्रॅक्टर मार्फत आम्ही स्टिंग ऑपरेशन केले त्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारे तफावत आढळली नाही त्यामुळे स्वाभिमानीचे पितळ आता उघडे पडले आहे. याबाबतीत आमच्याकडे सर्व सबळ पुरावे आहेत.
रणजित चव्हाण
कार्याध्यक्ष , रयत क्रांती संघटना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad