महागाईने तोडले सर्व रेकॉर्ड घाऊक महागाईचा निर्देशांक १५.०८ टक्क्यांवर गाठला मागच्या नऊ वर्षातील उच्चांक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ मे २०१४ रोजी भारतातील लोकांना अच्छे दिन येणार असल्याचे सांगितले होते. मात्र अच्छे दिन येण्याची प्रतिक्षा कायम असून लोकांचा संयम मात्र सुटत चालला आहे. इंधन, गॅस, भाज्या, वस्तूंची महागाई देशाला अधिकाधिक पोखरत चालली आहे. आजच डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात घाऊक महागाईचा निर्देशांक १५.०८ टक्क्यांवर पोहचला आहे. मागच्या नऊ वर्षातील ही सर्वाधिक वाढ आहे. मार्च २०२२ मध्ये हाच दर १४.५५ टक्के होता. तर मागच्या वर्षी एप्रिल २०२१ मध्ये हाच दर १०.७४ टक्के एवढा होता. इतिहासात पहिल्यांदाच सलग १३ महिने घाऊक महागाईचा दर हा दहा टक्क्यांच्या वर राहिलेला आहे. याआधी १९९८ साली महागाईचा दर १५.३२ टक्के होता. १९९८ नंतर पहिल्यांदा महागाईने उच्चांकी स्तर गाठला आहे.
काही दिवसांपूर्वीच CPI म्हणजेच ग्राहक दर निर्देशांकामध्ये वाढ होऊन एप्रिल २०२२ चा दर ७.७९ टक्क्यांवर पोहचला होता. मागच्या आठ वर्षातील ही सर्वाधिक वाढ होती. मार्च २०२२ मध्ये हाच दर ६.९५ होता. WPI आणि CPI वाढत असल्यामुळे अन्नपदार्थ, खाद्यपदार्थ यांच्या दरात भरघोस वाढ होत आहे. एका बाजूला पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढ होत असताना खाद्यपदार्थांची महागाई वाढल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना पाहावा लागत आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १६ मे २०१४ साली अच्छे दिनचे ट्विट केले होते. त्या ट्विटची लिंक येथे देत आहोत. आता जनतेनेच ठरवावे. मोदीजी म्हणाल्याप्रमाणे अच्छे दिन आले आहेत का?