दौलताबाद देवगिरी किल्ल्याच्या परिसरामध्ये नगर तलावाला आग.
शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास आग लागली असून आग मोठ्या प्रमाणात वाढून संपूर्ण किल्ल्याला वेढा दिला.
या आगीत दरम्यान किल्ल्यावरती वास्तव्यास असलेले पशुपक्षी प्राणी व झाडे जळून नष्ट झाली
तर मोर लांडोर आदी प्राणी सैरभैर होऊन किल्ल्याच्या परिसरातील शेतात जाऊन आश्रय घेतला.
अग्निशामक विभागाला कळवल्यानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु तो असफल ठरला,
देवगिरी किल्ल्यावर दरवर्षी आग लागण्याची घटना घडत असते त्याप्रमाणे शुक्रवारी दुपारी आग लागली व बघता बघता संपूर्ण किल्ल्याच्या परिसरात आगीने व्यापून रौद्ररूप धारण केले व किल्ल्याला वेढा दिला.
पर्यटक ग्रामस्थांना प्रश्न पडतो की प्रत्येक वर्षी आग कशी काय लागते की लावली जाते याचा तपास आता करण्याची गरज आहे.
दर वर्षी लागलेल्या आगीमुळे वन्यजीव यांच्या ऐतिहासिक वारर्षाला सुद्धा मोठी हानी पोहोचत असून या आगीमुळे किल्ल्यावरील पुरातन इमारती काळवंडून जात असून त्या नष्ट होण्याची शक्यता असल्याचे मत पुरातन अभ्यास करत आहेत.
91 इंडिया न्यूज नेटवर्क प्रतिनिधी प्रकाश लकडे दौलताबाद