किनवट तालुक्यातील नियत क्षेत्र ईस्लापूर मध्ये श्रमदानातुन वनराई बंधारा करण्यात आला
किनवट तालुक्यातील नियत क्षेत्र ईस्लापूर मधील वाळकी ( बु ) परीसरातील राखीव जंगल कक्ष क्र. २२९ , (A ). मध्ये लोकसहभागातून वनराई बंधारा करण्यात आला. यावेळी श्रमदान बंधारा बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी सहकार्य केले.
दिनांक २७ मार्च, रोजी वाळकी (बु ) येथील नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधारा करण्यात आला. केशव वाबळे, उपवनसंरक्षक नांदेड, श्रीनिवास लखमावार, सहाय्यक वनसंरक्षक रोहयो, वनपरीक्षेत्र अधीकारी प्रकाश शिंदे,यांच्या मार्गदर्शनाखाली येथील वनरक्षक,श्रीराम सज्जन, बळीराम चव्हाण, सुरेश, विष्णू, जाधव, संदीप ,मारुती, फुलवंताबाई, पद्मावतीबाई, शेळकेबाई, रेणुकाबाई, यांनी मोठी मेहनत घेऊन बंधारा तयार करण्यात आला.