Type Here to Get Search Results !

सक्तीची वीज वसुली त्वरित थांबवा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून महावितरण कंपनी सोलापूर येथे घेराव आंदोलन घालण्याचा इशारा

*सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना*  
 सोलापूर जिल्ह्यामधील कृषी पंपाची वीज कनेक्शन  सक्तीने वीजबिलापोटी तोडली जात आहे  .याच वर्षी ऐन उन्हाळ्यामध्ये वीज वसुलीसाठी अशाच पध्दतीने  कृषिपंपाची वीज तोडली होती त्यावेळी शेतकर्यांचे खूप नुकसान झाले होते  .
  एकीकडे यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने हातची पिके शेतकर्यांची गेली  .दुसरीकडे उसाचे कारखाने आताच कुठे सुरू झाले आहेत  .उसाचे पैसे अजून यायची बाकी आहेत  .अशावेळी शेतकर्यांकडे पैसे कुठून येणार  ?
ही शेतकर्यांची आर्थिक अडचण समजावून घेता महावितरण कंपनीने वीज तोड ताबडतोब थांबवावी यासाठी  *जिल्हाध्यक्ष* *अमोल हिप्परगे* यांच्या नेतृत्वाखाली मा.सांगळे साहेबांना  निवेदन देण्यात आले .
यावेळी सचिव उमाशंकर पाटील 
दक्षिण तालुकाध्यक्ष बेळ्यानी  सुट्टे , अक्कलकोट तालुका अध्यक्ष नरेंद्र पाटील ,जिल्हा कार्याध्यक्ष वसंत गायकवाड व प्रवक्ते इक्बाल मुजावर हजर होते  .
सक्तीच्या वीजबिलापोटी वीज तोडणी जर थांबविले नाही तर सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना  महावितरण कंपनी सोलापूर येथे घेराव आंदोलन घालण्याचा इशारा देण्यात आला  .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad