*सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना*
सोलापूर जिल्ह्यामधील कृषी पंपाची वीज कनेक्शन सक्तीने वीजबिलापोटी तोडली जात आहे .याच वर्षी ऐन उन्हाळ्यामध्ये वीज वसुलीसाठी अशाच पध्दतीने कृषिपंपाची वीज तोडली होती त्यावेळी शेतकर्यांचे खूप नुकसान झाले होते .
एकीकडे यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने हातची पिके शेतकर्यांची गेली .दुसरीकडे उसाचे कारखाने आताच कुठे सुरू झाले आहेत .उसाचे पैसे अजून यायची बाकी आहेत .अशावेळी शेतकर्यांकडे पैसे कुठून येणार ?
ही शेतकर्यांची आर्थिक अडचण समजावून घेता महावितरण कंपनीने वीज तोड ताबडतोब थांबवावी यासाठी *जिल्हाध्यक्ष* *अमोल हिप्परगे* यांच्या नेतृत्वाखाली मा.सांगळे साहेबांना निवेदन देण्यात आले .
यावेळी सचिव उमाशंकर पाटील
दक्षिण तालुकाध्यक्ष बेळ्यानी सुट्टे , अक्कलकोट तालुका अध्यक्ष नरेंद्र पाटील ,जिल्हा कार्याध्यक्ष वसंत गायकवाड व प्रवक्ते इक्बाल मुजावर हजर होते .
सक्तीच्या वीजबिलापोटी वीज तोडणी जर थांबविले नाही तर सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना महावितरण कंपनी सोलापूर येथे घेराव आंदोलन घालण्याचा इशारा देण्यात आला .