लोकसभेच्या जागावाटपावरुन महाविकास आघाडीत मोठी बिघाडी झाल्याचे दिसत आहे.
उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस आमने- सामने आले आहेत. उद्धव ठाकरे गटाने राज्यातील 48 पैकी 23 जागा लढवण्यावर ठाम आहे.
त्यावर काँग्रेसने स्पष्टपणे नकार दिला आहे. तुम्ही जर इतक्या जागा मागत आहात तर शरद पवार गट व काँग्रेसने निवडणूक लढवावी की नाही? असा आशयाचा सवाल केला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे गट 23 जागांपेक्षा एकही जागा कमी घेण्यास तयार नसल्याचे बोलले जात आहे.