चंन्द्रपुर जिल्हयात नाफेड खरेदी सरासरी उत्पादनावर आधारीत करा
चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे
चंद्रपूर/कोरपना:--चंद्रपूर जिल्ह्यातील नाफेड खरेदी ही शासनाच्या आणेवारी पद्धतीवर आधारित असून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्लॉट पाडून सरासरी काढल्या गेलेली नाही प्रति हेक्टरी सरासरी सात क्विंटल काढण्यात आली असून प्रत्यक्ष रब्बी हंगामामध्ये चना उत्पादन यवतमाळ वर्धा जिल्ह्यापेक्षा उत्पादन प्रत्यक्षात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 15 ते 20 क्विंटल असताना मात्र शेतकऱ्या कडून उत्पादित चना खरेदी मर्यादा सहा क्विंटल असल्याने रब्बी हगांमातील प्रत्यक्ष उत्पादन अधिक असल्याने व चुकीच्या आणेवारीपद्धतीचा फटका शेतकऱ्याना बसत असल्यामुळे आणेवारी पद्धतीत सुधारणा करुण प्रत्यक्ष उत्पादनानुसार खरेदी करण्यात यावी तसेच स्मार्ट योजने अतंर्गत जागतीक बॅक सहायीत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन मुल्यवर्धनसाखळी या उपक्रमाअतंर्गत अविकसीत क्षेत्रातील शेतकरी उत्पादक कंपनी प्राथमिक मान्यता प्रकल्प मजुरीं प्रकीया कामाना गती देऊन मागास व दुर्गम आदीवासी भागातील शेतकरी उत्पादक कंपनीना गती देण्याची व आदीवासी भागातील शेतकरी सभासदाना विकासाच्या प्रवाह मध्ये प्राधान्याने प्रस्ताव मंजुर करा अशी मागणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी कॉग्रेसचे आबिद अली यांनी निवेदनाद्वारे मागणी केली