प्रतिनिधीमैनोदिन सौदागर निगंनुर ता उमरखेड जि यवतमाळ : -
सर्वत्र दिपोत्सव आनंदाने साजरा होत असतांना निंगनुर येथील रहिवाशी शेतकरी युवकाने शेतातील गोठ्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी मध्यरात्री 1 वाजताचे सुमारास घडली .
शंकर नामदेव आखरे वय ३६वर्षे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून निंगनुर येथे आपल्या शेतामध्ये त्याचे कुटुंब राहात होते .काल मंगळवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास गोठ्यामध्ये त्याने गळफास लाऊन आत्महत्या केल्याचे कुटुंबाच्या निदर्शनास आले .
निसर्गाच्या अवकृपेमुळे अतिवृष्टीने शेतातील पिकांना जबर फटका बसल्याने आर्थिक संकट कोसळल्याने कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी तो आंध्र प्रदेशातील आदिलाबाद येथे कापूस वेचण्यासाठी गेला होता दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी तो गावाकडे आला होता . आर्थिक विवंचनेत सापडल्यामुळे त्याने हा पर्याय निवडून आपली जिवनयात्रा संपविली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे मृत्तक शंकरचे मागे आई वडील दोन पत्नी दोन मुले दोन मुली भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे .
त्याने आत्महत्या कोणत्या कारणाने केली असावी याबाबत अद्याप कारण समजु शकले नाही . बिटरगावचे ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार गजानन खरात. मोहन चाटे दत्ता कुसराम यांनी घटना स्थळ पंचनामा केला असून पुढिल तपास कर करीत आहेत .