Type Here to Get Search Results !

47 वर्षानंतर बहिरम येथे कापूस आंदोलनाची ठिणगी केंद्र सरकारच्या कापुस वीरोधी धोरणाचा कापूस जाळून केला निषेध.



47 वर्षानंतर बहिरम येथे कापूस आंदोलनाची ठिणगी.

 

बहिरम येथे कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कापुस वीरोधी धोरणाचा कापूस जाळून केला निषेध.


या कापूस आंदोलनाचे नेतृत्व केले प्रकाश साबळे व गोपाळ भालेराव यांनी




24 जानेवारी रोजी बहिरम कापूस आंदोलनाच्या शहिद शेतकरी श्रद्धांजली दिनाचा निमित्याने आयोजित कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कापुस विरोधी धोरणाच्या निषेध केला. बहिरम परिसरातील गावातील शेतकर्यांनी स्वयम् स्फूर्ती ने कापसाचे गाठोळे आणून जाळले कापसाचे भाव पाडल्या मुळे शेतकरी चिंता ग्रस्त झालेले आहे.त्यामुळे आपल्या संतप्त भावना बहिरम येथे व्यक्त केल्या.




केंद्र सरकारने आस्टेलिया वरून 51 हजार टन कापूस आयात केला त्यावरील 11% आयात शुल्क माफ केले. आणि केन्द्र सरकार बडया कॉटण लॉभी पुढे झुकून शेतकऱ्यांवर अंन्याय करत असल्याची भावना निर्माण झाली आहे.त्यामुळे जो पर्यंत कापसाची भाव वाढ होणार नाही तो पर्यंत सरकारला सळो की पळो करून सोडू असा इशारा प्रकाश साबळे यांनी दिला आहे.

या प्रसंगी शेकोडो शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad