Type Here to Get Search Results !

अपघात घडतात रोज छोटे, दखल मात्र होत नाही कुठे? फुलसावंगी फाटा ते नारळी ईसापुर रोडचे काम रखडले

अपघात घडतात रोज छोटे, दखल मात्र होत नाही कुठे?
फुलसावंगी फाटा ते नारळी ईसापुर रोडचे काम रखडले




उमरखेड प्रतिनिधी:- संजय जाधव
  
अनेक दिवसापासून प्रस्तावित असलेले ईसापुर नारळी म्हणजे फुलसावंगी फाटा ते नारळी रोड चे काम सुरु तर झाले मात्र ते अतिशय संथ गतीने चालू असल्याने नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम करण्यासाठी रस्त्याच्या •बाजूला गिट्टी तर आणून टाकले मात्र पुढचे काम करण्यास ठेकेदार विसरले


की काय ? हा गहण प्रश्न आहे. या गिट्टी मुळे रोज छोटे छोटे अपघात होत असून यापेक्षा निदान पहिला रस्ता बरा होता त्यामुळे गाडी फक्त खड्डयात तरी जात होती आता मात्र गिट्टी वर जाऊन माणूस स्वर्गवासी होण्याची चिन्हे निर्माण होत आहेत असे म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे. आधी रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी नागरिकांना प्रचंड संघर्ष करावा लागला होता आता

पुढील काम सुरू करण्यासाठी आंदोलन करावे लागेल की काय हा मोठा प्रश्न आहे. या रस्त्यांच्या कामामुळे ईसापुर नारळी येथील नागरीकाना पडत आहे नारळी व ईसापुर येथील नागरीक व विद्यार्थी आता प्रचंड त्रासले गेले असून होत असेल तर रस्ता करा अन्यथा सोडून द्या असे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्यासाठी संघर्ष हा नारळी इसापूर करांच्या पाचवीलाच पुजलेला असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या निराकारण होईल काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पाच मार्चपर्यंत रोडचे काम सुरू न झाल्यास इसापूर व पिंपळवाडी येथील नागरिक मोठा आंदोलन उभा करावा लागेल असे त्याने प्रतिनिधीशी बोलताना सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad